Wednesday, April 8, 2020

अहिराणी गाणी

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा
कोन गाव परनाले जाशी वं मन्हा रसिक राजा ||
काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
घड्याळ बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सानं घड्याळ न कस्सानं काय
डेडोर ( बेडुक??) बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा....

काय बांधी उना व मन्हा रसिक राजा
पोयतं बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न पोयत न कस्स न काय
नाडा बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मन्हा रसिक राजा...

काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
बाशिंग बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न बाशिंग नि कस्सा न काय
सुपडं बांधी उना व मना रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मना रसिक राजा

- अहिराणी साहित्य

अहिराणी गाना - मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

आंग्या पांग्या ना संसार नही कराव माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

मी ते शेतकरी नवरा नई कराव माय
यान्हा पायल्या ना भाकरी कोन करी माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं पोलीस भरतार नइ कराव माय
यान्हा पट्टानी पालीस ( पॉलिश) कोन कराव माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं मास्तर भरतार नही कराव माय
यान्हा पगारना नोटा कोन मोजी माय
मी ते घागर धरी धरी...!

मी तं साह्येब भरतार करसु वं माय
त्यान्हा गयामां हात घाली फिरसु वं माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय!

- अहिराणी साहित्य 

अहिराणी गाना - बोली मनी अहिराणी

बोली मनी अहिराणी,

जशी दहिमान लोणी


सगया ताकना पारखी,


इले पारख नही कोणी


बोली मनी अहिराणी,


जशी दहिमान लोणी 


पंढरपुरले बाई वैसाले माली इस


हाथ मना पुरेना इठूला खाल बस  


- अहिराणी साहित्य

अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह!!!

जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं  .. तरीसुद्धा ही त्यांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली. दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते. त्यांचीही मी ऋणी आहे.

त्यांच्याकडुन जी माहिती प्राप्त झाली ती याप्रमाणे:
पुर्वी लहानपणीच मुला-मुलींची लग्न होत असल्याने सासु-सुन किंवा सासुरवास अशा गोष्टी या ओव्यांमधुन दिसत नाही. हं...मधुनच जावा-जावांचे खटके किंवा नणंद-भावजयांचे टोमणे जाणवतात. माझी आई तर नेहमी म्हणे : अगं आधी आईच्या हाताखाली सुन म्हणुन रहावं लागतं नंतर सासुच्या! पहाटे नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे. आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म...सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतय. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊkhandeshibhau.blogspot.com

No comments:

Post a Comment